Monday, 12 May 2014

मे महिन्याच्या आठवणी

शर्वरीची सुट्टी सुरु झाली कि मला माझी सुट्टी हटकून आठवते . कधी एकदा परीक्षा संपतेय असा होवून जायचं मला. शेवटच्या पेपर चा अभ्यास कधीच व्हायचा नाही माझा. आणि जशी परीक्षा संपायची तशी एकदम खुश होवून जायची मी. फारसे प्लान नसायचेच. म्हणजे आताच्या पिढीचे प्लानिंग बघितली कि वाटत , बापरे! किती हि तयारी सुट्टीची!पण आमच्यावेळी सगळ बाबांच्यावरती अवलंबून असायच. वात बघत असायचो बाबा कधी एकदा बेळगाव ला घेवून जातात याची. आम्ही सगळे एकदम जायचो, म्हणजे मी, केदार , मोठे काका-काकू, त्यांची ४ मुलं. धमाल असायाची.
  बेळगाव ला ४नंबर काका राहायचा माझा. प्रत्येक मे महिन्यात त्याच्याकडे दत्तउत्सव असायचा. अजूनजुचे खूप लोक यायचे . खूप धमाल असयची. पंगती वर पंगती उठायच्या. आम्ही सगळे खूप मस्ती करायचो.
बेळगाव ला जाण्याची वाट बघण्याच कारण अजून एक होत, बाबा संकेश्वर ला एस. टी कॅन्टीन चा मेदुवडा आणि चटणी आणायचे. गाडी सुरु झाली कि कधी एकदा संकेश्वर येत याची आम्ही वात बघयचो. आम्हा सगळ्या भावंडांचा आवडता पदार्थ होता तो. आम्ही सगळे मोठ्या चवीने खायचो. अजूनही त्याची चव आठवते मला.
बेळगाव ला काका त्यावेळी अनगोळ माळ ला राहायचा. त्यानंतर त्याने ३-४ घरे बदलली पण माझ्या जास्त लक्षात राहिलेलं त्याच घर म्हणजे अनगोळ माळा वरचच. ४खोल्या , मागे अंगण आणि पुढे अंगण. पुढच अंगण भलामोठ होतं. तिथे मंडप घातलेला असयचा. आम्ही सगळी भावंडे तिथेच झोपायचो. आम्हा सगळ्यात भर पडायची ती म्हणजे माझ्या दोन आत्यांच्या मुलींची. आम्ही सगळे जवळ जवळ सारख्याच वयाचे आहोत, त्यामुळ दंगा धुडगूस तर बघूच नये, इतका असयचा. आणि त्यात भर म्हणजे जवळ राहण्या-या  मुलांची .सकाळी ६.३०-७ ला सुरु होणारा दिवस संध्याकाळी देवाच्या आरतीने संपायचा. सगळ्या आरत्या मोठ्याने म्हणायची आमची स्पर्धा असयची. मोठ्यामोठ्याने टाळ वाजवत आम्ही आरत्या म्हणायचो, आणि मधेच कुणी चुकला तर फिदीफिदी हसायचो. माग कुणीतरी मोठ आमच्याकडे डोळे मोठे करून बघायचे. तेवढ्यापुरते शांत व्हायचो आम्ही आणि थोड्यावेळात परत सुरु… आरती झाली रे झाली कि प्रसाद वाटायला आम्ही सगळे पुढे, ३-४ प्रकारचे प्रसाद असायचे.
रात्रीची आरती झाली कि पंगती बसायच्या, फारशी भूक नसायची कारण दिवसभर काही ना काही सुरु असायचच. माग मंडपात अंथरूण पडायची . पण लगेच झोपली तर ती वानरसेना कसली?? कुणाच्या नकला, कुणाचा नाच, कुणाच्या गोष्टी, भेंड्या, भांडण असा सगळ साग्रसंगीत व्हायचं आणि माग आजी किंवा काकू ओरडली कि झोपायचो. 
 खरच, खूप सुंदर दिवस होते. मनमुक्त जगण्याचे दिवस. ते परत तर येणार नाहीत पण त्यांनी निर्माण केलेल्या आठवणी मात्र नेहमी बरोबर असतील. एका सुंदर बालपणीच्या आठवणी.


Monday, 5 May 2014

भिती

खुप इच्छा होतेय आज, एखाद्या शांत रोड वर मनसोक्त भटकाव. पण असा रोड कुठे मिळणार? सगळीकडे इतकी गर्दी आहे की काही विचारु नये. आणि जरी एखादा रोड असा शांत मिळाळा तरी तिथुन एकटं जायची भिती वाटते. इतक्या वेड्यावाकड्या गोष्टी एेकल्या आहेत की,असा रस्ता दिसला तरी एकटं जाण्याची हिम्मत नाही. किती असुरक्षित झाल आहे सगळ. लोकांची मानसिकता इतकी विकृत कशी झाली? आणि ती पण इतक्या अचानक?! बलात्कार, खुन हे तर रोजच्या जगण्याचा भाग झाल्यासारखे वाटतात आता. हे आत्ताच घडत असेल अस नाही , आिधपण घडत असणार. पण मागच्या २-४ वर्षात हे प्रकार एवढे वाढले आहेत की बोलायची सोय नाही. का आता मुलिंना बोलायला बळ मिळाळ आहे या सगळ्यांविरुध्द बोलायच? काहीही असल तरी पावलोपावली भिती वाटते एवढ़ खरं. कशाचीही शाश्वती नाही. कधी काय घडेल आणि काय कानावर पडेल याची भिती वाटतं रहाते सारखी. याला उपाय? सध्या काहीच नाही. जोपर्यंत लोकांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत शांत रोड वरुन एकट जाण्याची हिम्मत नाही ,एवढ़ खर.

Saturday, 12 October 2013

चारोळ्या

पौर्णिमेचा चंद्र हळुच चोरपावली येतो,
तुझ्या आठवणी हळुच कुशीत ठेवुन जातो.

पारीजात फुलला तुझी माझी स्वप्ने घेवुन,
त्याला कळलेच नाही, रात्र गेली अमावस्येची होवुन.


जन्म माझा तुझ्यासाठी
श्वास माझा तुझ्यासाठी
स्वप्न माझी तुझ्यासाठी
आणि तु,
तु मात्र तिच्यासाठी

आता कुठे तु कळतो आहेस,
त्या चंद्रासारखा तुही हट्टी आहेस,
दर पौर्णीमेला तुझ्या आठवणी घेवुन येतो,
आणि माझ कसं चुकलं हेच सांगत रहातो.

तुला चंद्राची प्रतिमा द्यावी कशी?
ते निदान पौर्णिमेला भेटतो तरी,
तुझ्या माझ्यातली अमावस्या मात्र सुरुच आहे

तुझ्या माझ्यातला अव्यक्त हुंकार,
तुझ्या माझ्यातल अव्यक्त प्रेम,
सांगता सांगता राहुन गेलेल,
समजता समजता न समजलेल.


तु तू न राहिलास,मी मी न राहिले
तुझ्या माझ्या नात्याचे रंग बदलले
अव्यक्त व्यथा, व्यक्त कथा
सगळ सगळच बदललं.

चंद्राला पाहिले की तुझा भास होतो,
तुला शोधण्याचा मला मोह होतो,
तुझ्या मोहाने तुला शोधते आहे
विसरते आहे अमावस्या सुरुच आहे.

तुझ्या हातामधे माझा हात
तुझ्यामधे गुंतलेलं माझ मन,
सांग कसं सोडाव सगळं?
माणुस तोडला तरी, नातं तोडावं कसं?





Sunday, 19 May 2013

आठवणीतील जिलेबी...

आकाराने वेटोळी, रंगाने केशरी, गरम गरम आणी कुरकुरीत जिलेबी बघितली की मला माझ्या शाळेचे दिवस आठवतात.
मी शाळेत असताना, १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी ला, कोल्हापूर मधे , रस्त्यावर जागोजागी जिलेबी तळणार् यांचे मंडप लागलेले असायचे. सगळीकडे तो गोड़ वास पसरलेला असायचा. त्या दिवशी ध्वजवंदनाला जायची गडबड असायची, त्यामुळं मी बाबांना सांगुन ठेवायची की तुम्ही जिलेबी घेवुन या.
जशी शाळेतुन परत या़यचे आधी जिलेबी आणली आहे का ते बघायचे. नसेल तर आईकडून पैसे घेउन स्वारी क्षणात निघायची. आमच्या घराच्या मागेच एक जिलेबी तळणारा बसलेला असायचा. एका मोठ्या परातीत पाकातुन काढलेल्या जिलेबींचा ढीग असायचा, आणि दुसरीकडे तो गरम गरम जिलेबी तळत असायचा.सगळीकडे मस्त वास पसरलेला असायचा. त्या वासानी जिलेबी ची भुकअजुन चाळवायची. जिलेबी घेवुन मी घरी धुम ठोकायचे. आणि मग जो आडवा हात मारायचे की ज्याच नाव ते. गरम गरम जिलेबी मिटक्या मारत खाण्याची मज़ा काही औरच....
आता कुठुनही जिलेबी तळण्याचा वास आला , तरी मला माझे शाळेतले दिवस आठवतात.
 

Tuesday, 7 May 2013

दुपार

Kया भयानक उकाड्यात, एसीच्या थंड हवेत बसलेली असताना, कधीतरी मनामधे उगवते ती शाळेत असतानाची दुपार. 
स्वाभाविक आहे की दुपार , उन्हाच्या त्रासामुळे खुप लोकंाना आवडत नाही. पण मला आवडते. कारण माझ्या लहानपणी ती दुपार पण छान वाटायची.
शनिवारी शाळा सकाळची असायची. आईच्या नोकरीमुळे घरी मी आणि केदार, आम्ही दोघेच असायचो, त्यात सुध्दाजेवण झाल की हा गुडुप व्हायचा.
आमचं घर दोन भागात विभागलेलं होतं. एका बाजुला स्वयंपाकघर आणी एक खोली आणी दुसर् या बाजुला सोपा ( बाबांच्या भाषेत) आणी देवघर. मधेअंगण होतं. अंगणात लावलेला पिवळ्या फुलांचा वेल सोपा आणी त्या समोरच्या खोलीवरच्या छपरावर पसरला होता. हिरवागार एकदम. दुपारच्या वेळी माझ्यासारखाच सुस्तावला आहे अस वाटणारा. त्यावर अधुनमधुन येणार् या चिमण्या (कधी कधी खुप गप्पा मारणार् या). खोलीमधुन पलंगावर पडुन बाहेर वेलींमधुन येणारे उन्हाचे कवडसे बघण्यात खुप वेळ जायचा माझा. आणी आपणहीत्याच शांततेचा एक भाग आहोत असं वाटायच.
अजुनही वाटतं, फक्त एकदाचं, ते जुनं घरं, त्या वेली , ते कवडसें, त्या चिमण्यांच्या गप्पा आणी घरात आणी माझ्या मनात भरुन राहिलेली शांतता अनुभवा़ला मिळावी.