Friday, 20 July 2012

आज श्रावाणातला पहिला शुक्रवार.....आठवण करून देणारा लहानपणची . माहिती नाही पण सकाळपासूनच सगळ आठवायला लागल. कोल्हापुरातले ते दिवस कधीही परत न येणारे...
साधारण सात  - आठ वर्षाची असताना आम्ही ज्यांच्याकडे भाड्याने राहायचो त्यांच्याकडे सकाळी प्रसादाच निमंत्रण असायचं. कुमारिका म्हणून मी  सवाष्ण म्हणून आई. मी आणि आई साधारण सकाळी 9.30-9.45 वाजता त्यांच्याकडे  जेवायला जायचो . पावसामुळे हवेत गारवा असायचा....
त्यांच्या माजघरात आमची पान मांडलेली असायची...बाजूलाच देवघर होत त्याचंसुरेख . सुरेख पूजा केलेली असायची अंबाबाई ची . सवाष्ण जेवन्णार असल्यामुळे जेवण साग्रसंगीत असायचं. माझ्यासाठी रु1 दक्षिणा असायची आणि त्यावेळी  रु1 सुद्धा खूप जास्त होता.
अजूनही त्यांच्या माजघरातला वास आठवतो मला...गरम गरम जेवणाचा ...वरण-भाताचा-पुरणपोळ्यांचा , देवासमोर लावलील्या उदबत्तीचा, देवीला घातलेल्या हारांचा...
सगळ आठवलं आणि आजची सकाळ एकदम प्रसन्न होऊन गेली...