माझ्या मनाच्या कोपर्यात असणारा तु… असा अचानक उसळी मारुन वरती येतोस. . आणि मला जाणीव करून देतोस, तू आहेस … माझ्याबरोबर आहेस … माझ्या मनामध्ये तुझा वावर सततचा आहे… पण तू कुणाला दिसत नाहीस … मी जी कुणी आहे ती तुझ्यामुळे आहे… तुझ्यामुळे मला अस्तित्व आहे …
कधी कधी वाटतं तु हरवला आहेस… दूर कुठेतरी निघुन गेला आहेस…माझा सखा मला सोडून गेला आहे… मग मी शोधत राहते तुला … माझ्यामध्ये… माझ्या मनामध्ये … आजुबाजूच्या लोकांमध्ये, कुठे दिसतोस का ते बघते… तुझी एखादी झलक … एक नजर … कुठे आहे , कुठे आहे ? कितीही, काहीही केलं तरी मनाचा धोशा काही कमी होत नाही. माझं मन माझ ऐकत नाही … खरतर उगाचच असं म्हणायचं , तसंपण ते तुझंच ऐकतं … त्याला फक्त तुझ्याच सूचना कळतात. मेंदूचा भुगा होईपर्यंत विचार करते मी … मग थकते… तू निघून गेला आहेस अशी समजूत काढते स्वतःची, म्हणजे कुणाची , ते माहिती नाही , कारण, तू आयुष्यात आलास आणि मी माझी राहिले नाही… मन आक्रंदत राहतं… माझा सखा शाम मुरारी इथेच आहे … कुठेच नाही गेला आहे… पण दुसरं मन ऐकत नाही ते सारखं म्हणंत रहातं तो नाहीये … जो होता तो एक भास होता … तो तुझा कधीच नव्हता … तुला वाटंत होतं अस… मनाच्या भांडणामध्ये मी थकते … गप्प बसते
पण डोळे तुलाच शोधत राहतात … मन तुलाच साद घालत रहातं … तुझ्या अवतीभवती करणाऱ्या मनाला गप्प बसवण जमत नाही मला …
आणि अगदी अचानक असा काहीतरी घडतं ज्यामुळे मला जाणीव होते परत, तू असल्याची… माझ्या जवळ असल्याची… माझ्या मनात असल्याची … तू कुठेच गेलेला नसतोस … माझ्या जवळच असतोस … माझ्या मनामध्ये … मलाच उगाच वाटत तू निघून गेला आहेस म्हणून … पण तू या वेडाबाईला सोडून गेलेलाच नसतोस… तू इथेच असतोस… माझं मन व्यापून उरणारा माझा सखा सावळा … माझा शाम मुरारी … हि जाणीव नाहीशी व्हावीशी वाटते आता … तुझ्यामध्ये हरवुन जावसं वाटतं … या जाणीव नेणीवाच्या पलीकडे … जिथे फक्त तु आणि तुच असशील …
कधी कधी वाटतं तु हरवला आहेस… दूर कुठेतरी निघुन गेला आहेस…माझा सखा मला सोडून गेला आहे… मग मी शोधत राहते तुला … माझ्यामध्ये… माझ्या मनामध्ये … आजुबाजूच्या लोकांमध्ये, कुठे दिसतोस का ते बघते… तुझी एखादी झलक … एक नजर … कुठे आहे , कुठे आहे ? कितीही, काहीही केलं तरी मनाचा धोशा काही कमी होत नाही. माझं मन माझ ऐकत नाही … खरतर उगाचच असं म्हणायचं , तसंपण ते तुझंच ऐकतं … त्याला फक्त तुझ्याच सूचना कळतात. मेंदूचा भुगा होईपर्यंत विचार करते मी … मग थकते… तू निघून गेला आहेस अशी समजूत काढते स्वतःची, म्हणजे कुणाची , ते माहिती नाही , कारण, तू आयुष्यात आलास आणि मी माझी राहिले नाही… मन आक्रंदत राहतं… माझा सखा शाम मुरारी इथेच आहे … कुठेच नाही गेला आहे… पण दुसरं मन ऐकत नाही ते सारखं म्हणंत रहातं तो नाहीये … जो होता तो एक भास होता … तो तुझा कधीच नव्हता … तुला वाटंत होतं अस… मनाच्या भांडणामध्ये मी थकते … गप्प बसते
पण डोळे तुलाच शोधत राहतात … मन तुलाच साद घालत रहातं … तुझ्या अवतीभवती करणाऱ्या मनाला गप्प बसवण जमत नाही मला …
आणि अगदी अचानक असा काहीतरी घडतं ज्यामुळे मला जाणीव होते परत, तू असल्याची… माझ्या जवळ असल्याची… माझ्या मनात असल्याची … तू कुठेच गेलेला नसतोस … माझ्या जवळच असतोस … माझ्या मनामध्ये … मलाच उगाच वाटत तू निघून गेला आहेस म्हणून … पण तू या वेडाबाईला सोडून गेलेलाच नसतोस… तू इथेच असतोस… माझं मन व्यापून उरणारा माझा सखा सावळा … माझा शाम मुरारी … हि जाणीव नाहीशी व्हावीशी वाटते आता … तुझ्यामध्ये हरवुन जावसं वाटतं … या जाणीव नेणीवाच्या पलीकडे … जिथे फक्त तु आणि तुच असशील …







