Saturday, 17 September 2011

आज सकाळी office ला जाताना सहज मनात विचार आला...खरच का धडपडतोय आपण इतके?कशासाठी? आयुष्य जगण्यासाठी या या गोष्टी गरजेच्या आहेत हे कुणी ठरवलं? मला काय हव आहे आणि काय नको हे कोण ठरवत? कहरच जे मला हव आहे असा वाटतंय ते हव आहे का? का उगाच एखादी गोष्ट मनात आली म्हणून हवी आहे??...
मला जे हव आहे ते खरच हव आहे कि आजूबाजूला जे घडतंय त्याचा परिणाम आहे? आजूबाजूच्या घाडणाऱ्या गोष्टी मी टाळू शकत नाही पण त्यामुळे मी किती वाहवत जातेय हे कस कळणार?खूप गोष्टी मागे सुटल्यात...आणि आता कितीही केल तरी ना मागे जाता येणार आहे ना त्या गोष्टी परत मिळणार आहेत. आयुष्य हे बदलत राहत, मान्य. पण किती बदलाव?? का बदल त्रासदायक वाटतोय? का मन सगळ सोडून त्या काळ्या मातीकड परत जाण्यासाठी धडपडतंय?????

No comments:

Post a Comment