Sunday, 18 September 2011

प्रत्येक गोष्ट perfect असावी असा अट्टाहास कशासाठी? आपण काय कराव आणि काय नाही , परत कशापद्धतीने कराव हे आपणच का नाही ठरवत? का असा विचार करतो, अरे आपण करतोय ते बरोबर आहे का नाही ? अरे समोरचा काय म्हणेल? आपण का हे विसरतोय आयुष्य एकदाच मिळणार आहे आणि ते आपल्यापद्धतीने जगण्याचा आपल्याला अधिकार आहे....का विसरत चाललो आहे आपण हे कि आयुष्य सुंदर आहे आणि त्याचा महोत्सव करायचा आहे आपल्याला.....
आता राहिला प्रत्येक गोष्ट perfect असण्याचा अट्टाहास...कशासाठी? हा अट्टाहास सगळ्या नाशाला कारणीभूत होत नसेल ना? असा अट्टाहास बरोबर tension घेऊन येतो. का आपण आपल्या आनंदासाठी काही करत नाही? कोणत्याही यशस्वी कलावंताला विचारा तो पण हेच सांगेल त्याला आनंद देणारी कलाकृती त्याची उत्कृष्ट कलाकृती असेल माग ती बाकीच्यांना आवडो व ना आवडो....
थोडक्यात काय तर जे करताय त्यात आनंद शोधायला शिका...सगळा जागाच माग आनंदमय  होऊन जाईल...

No comments:

Post a Comment